हजारो शेतकऱ्यांची लाखो क्विंटल तूर खरेदीविना पडून असल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांची तूर विकत घेतली जात नाही म्हणून सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुंबई येथील जिल्हाधिकारी कार्यलयावर धडक दिली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस मुंबई अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी ...
पुढे वाचातुरखरेदीच्या संदर्भातील राज्य शासनाची भूमिका म्हणजे केवळ नियोजनाचा अभाव नाही, तर शेतकऱ्यांचा जाणीवपूर्वक चालवलेला छळ आहे. २२ एप्रिलला राज्यातली तूरखरेदी केंद्र अचानक बंद करुन शासनानं शेतकऱ्यांवर 'सुलतानी' संकट आणलं. त्यानंतर काढलेल्या तूरखरेदीच्या शासन निर्णयात शेतकऱ्यांवर अनेक जाचक अटी लादून, फौजदारी कारवाईची धमकी देऊन शासनाने शेतकऱ्यांच्या तूरखरेदीचा कुठलाही इरादा नसल्याचे संकेत दिले आहेत, तुरीच्या संकटाला च'तूर' मुख्यमंत्री जबाबदार आहेत, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय म ...
पुढे वाचाएका एनजीओने प्रकाशित केलेल्या अहवालाचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आज सभागृहात केला.या एनजीओने अनेक ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेच्या कामाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी काढलेल्या निष्कर्षांनुसार सरकारने चुकीच्या ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेची कामे केली आहेत असे या एनजीओचे म्हणणे असल्याची माहिती पाटील यांनी दिली.खासगी प्रयत्नांनी जिथे जलयुक्त शिवार योजनेची कामे झाली त्या ठिकाणी प्रत ...
पुढे वाचा