गेली साडेपाच दशके महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय पातळीवर अतिशय लोकाभिमुख व मोठा जनाधार असलेलं प्रभावशाली राजकीय नेतृत्व म्हणून लौकिक असलेले खासदार शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आपले राजकीय गुरू स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कृषिऔद्योगिक समाजाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या पवार साहेबांनी सामान्य माणसाच्या हितासाठी ध्येयवाद जपत सामाजिक सुसंवाद, राजकीय भान व प्रशासकीय कौशल्याच्या आधारे उद्योग, कृषीक्षेत्र, अन्नसुरक्षा, कृषी संशोधन, संरक्षण, सहकार क्षेत्र, महिला सक्षमीकरण, दुर्बल घटकांसाठी आरक्षण, आपत्कालीन व्यवस्थापन, गरीब व उपेक्षित विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण अशा विविध क्षेत्रात अभूतपूर्व अशी कामगिरी नोंदवली व अनेकांच्या आयुष्याला प्रकाशवाटा दाखवल्या.
- शरद पवार